बंद

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (समाज कल्याण )

विभागाची माहिती
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्रमांक 4370, दिनांक 5 नोव्हेंबर 1928 अन्वये स्टार्ट समितीची स्थापना. 1930
सदर समितीमध्ये एकूण 10 सदस्यांचा समावेश. सदर समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश. समितीचा अहवाल 1930 साली शासनास सादर.1932 मागास समाजासाठी 1932 साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना. श्री. ओ एच बी स्टार्ट, आय. सी. एस., खात्याचे पहिले संचालक.19471947 साली संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित.1957 शासन निर्णय क्रमांक बी.सी.ई. 2857 डी, दिनांक 23 सप्टेंबर 1957 अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करुन समाज कल्याण संचालनालयाची स्थापना. 1972 समाज कल्याण विभागाची निर्मिती होऊन शिक्षण व समाज कल्याण अशी विभागणी माहे मार्च 1972 मध्ये झाली. 1983 समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग असे नामकरण सन 1983 मध्ये करण्यात आले.1999 मार्च,1999 मध्ये समाज कल्याण विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग अशी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली.2001फेब्रुवारी 2001 मध्ये समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाचे नाव सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा विभाग असे करण्यात आले.

श्री.किशोर मा. भोयर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

1. कर्मविर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांन 14/08/2018 अन्वये सदर योजनेचे कामकाज पुर्ण केले जाते.
योजनेची थोडक्यात माहीती असुसूचित जाती व नवबौध्द घटका करिता ही योजना सन 2004-05 पासुन कार्यान्वीत असून दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेत मजुर कुटुबांना उदर निर्वाहाचे अन्य साधन नसल्याने त्यांना रोजगार हमी योजना किंवा खाजगी व्यक्तीकडे मजुरी करावे लागते. परिणामी त्यांच्या राहणीमानावर प्रतिकुल परिणाम होतो. त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा याकरिता त्यांचे मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशानेही योजना राबविण्यात येते.
आवश्यक कादपत्रे 1) जातीचा दाखला (उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला)
2) शाळा सोडल्याचा दाखला अथवा वयाचा कोणताही पुरावा.
3) रहिवासाचे प्रमाणपत्र व दारिद्रय रेखेखाली असल्या संबंधी ग्रामसेवक व गटविकास अधिकारीयाच ेप्रमाणपत्र
4) अर्जदार भुमीहीन शेतमजुर असल्याबाबत तलाठी व तहसिलदार सरंनी दिलेले प्रमाणपत्र.
5) विधवा स्त्रियाच्याबाबतीत पतीच्या मृत्युचा दाखला.
6) परित्याक्त्या स्त्रियाच्या बाबतीत सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र.
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वर्धा
सदर लिंक
आवश्यक शुल्क सदर योजना 100 % अनुदानित आहे.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 6-8 महिने
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
2. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांक 26/12/2024 अन्वये सदर योजनेचे कामकाज पुर्ण केले जाते.
योजनेची थोडक्यात माहीती अनु. जाती व नवबौध्द घटकातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात जागे अभावी प्रवेश मिळालेला नाही अशा 10 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदरची योजना तालुका तसेच जिल्हा स्तरावर देण्यात येते.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ भा.स.शि अंतर्गत मिळणारा निर्वाह भत्ता वजावट करुन मिळणारी रक्कम खालील प्रमाणे आहे.
इतर जिल्ह्याच्या ठिकाणी :- रु. 43000/-
तालुक्याच्या ठिकाणी :- 38000/-
या व्यतीरीक्त शैक्षणिक साहीत्या करीता
अभियांत्रिकी व वैद्यकिय अभ्यासक्रमास :-5000/-
अन्य शाखा :- 2000/-
आवश्यक कादपत्रे 1. जातीचा दाखला
2. शाळा सोडल्याचा दाखला व मागील वर्षाच्या गुणपत्रिका
3. अधिवास प्रमाणपत्र
4. उत्पनाचा दाखला
5. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहीवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी)
6. विद्यार्थ्याने सादर केलेली माहीती खरी व अचूक असल्याचे स्वयंघोषणापत्र
7. कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसलेबाबतचे प्रमाणपत्र.
8. भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा
9. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.
10. उपस्थिती व चारित्र्य प्रमाणपत्र
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑनलाईन
सदर लिंक https://hmas.mahait.org/
आवश्यक शुल्क रु. 23.60 (including GST).
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 ते 2 महीने
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://hmas.mahait.org/
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
3. अत्याचारास बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्य
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १) युटीए-१०९५/प्र.क्र-१६९/मावक-२. दिनांक २४ सप्टेंबर १९९७
२) युटीए-१०१३/प्र.क्र.२५९/सामासु. दि २१ ऑगस्ट २०१३
३) युटीए-१०१६/प्र.क्र.२९८ / साभासु. दि. २३ डीसेंबर २०१६
योजनेची थोडक्यात माहीती जातीयतेच्या कारणावरून अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती /जमाती व्यक्तींना अर्थसहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे..
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटुंबावर / व्यक्तींवर अत्याचार
घडल्यास, सदर गुन्ह्यांची नोंद नागरी हक्क संरक्षण अधिनीयम १९५५ खाली / अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ खाली झालेली असल्यास गुन्ह्याच्या स्वरूपावरून रु. १ लाख ते ८.२५ लाखापर्यंत अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते.
आवश्यक कादपत्रे योजनेच्या लाभासाठी जातीच्या दाखला व काही गुन्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) अर्ज करण्याची गरज नाही सदरचा प्रस्ताव हा पोलीस विभागामार्फत कार्यालयास प्राप्त होतो.
सदर लिंक
आवश्यक शुल्क
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 ते 2 महीने
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
4. अनुसुचित जातीच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय एस टी एस-2011/प्रक्र 439/अजाक-1 दि. 06 डिसेंबर2012
2.शासन निर्णय एस टी एस-2015/प्रक्र 102/अजाक-1 दि. 03 सप्टेंबर 2015
3.शासन निर्णय एस टी एस-2016/प्रक्र 125/अजाक- दि. 27मार्च 2017
योजनेची थोडक्यात माहीती अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी व त्यांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी सदर योजना राबविण्यात येत आहे.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ स्वयंसहायता बचत गटांना ३.५० लाख रुपयांच्या कमाल मर्यादित (९० टक्के) शासकीय अनुदान १० टक्के स्वयंसहायता बचत गटांचा हिस्सा) १ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील मात्र त्याची किमत कमाल शासकीय अनुदानापेक्षा (३.१५) लक्ष शासकीय अनुदान व जादा रक्कम बचत गटांनी खर्च करावी. लाभाचे हस्तांतरण आर.टी.जी.एस. द्वारे बचत गटाच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होते.
आवश्यक कादपत्रे 1.महाराष्ट्राचा रहिवाशी असावा
2.बचत गटातील 80%सदस्य हे अनु.जाती व नवबौध्द घटकाचे असावे. किमान
3.बचत गटातील सर्व सदस्यांचा एकत्रीत फोटो असावा
4.बचत गट स्थापनेचा ठराव असावा
5.रु.100 स्टॅम्प पेपर वर नमुद करावे कि
अ)या अगोदर मिनी ट्रॅक्टर योजनेचा शासनाकडुन लाभ घेतला नाही.
ब) आरटीओ कडील नोंदणी शुल्क भरण्यास बचत गट तयार आहे.
क)योजनेचा स्वहिस्सा 10% रुपये 35,000/- बचत गट भरण्यास तयार असावा.
6.बचत गट नोंदणीकृत असावा व नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडावे.
7.विवाहीत महिलांच्या बाबतीत जात प्रमाणपत्र वडीलांच्या नावे व ओळखपत्र हे पतीच्या नावे असेल तर महिलांनी 20 रु च्या स्टॅम्प पेपरवर स्वहस्ते साक्षांकीत करुन दयावे.
8.मिनी ट्रॅक्टर मिळविण्यासाठी सर्व सदस्यांचा ठराव व सर्व सदस्यांची सहीनीशी यादी.
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑफलाईन
सदर लिंक
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 ते 2 महीने तसेच शासनाकडुन प्राप्त निधीच्या अधिन राहुन
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
5. अनु. जाती अभ्युदय योजना (प्रधानमंत्री आदर्शग्राम योजना)
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांक 26/08/2019 अन्वये सदर योजनेचे कामकाज पुर्ण केले जाते.
योजनेची थोडक्यात माहीती केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्रालयाने सन 2009-10 या वर्षापासून प्रायोगिक तत्वावर प्रधानमंत्री आदर्शग्राम योजना लागू केलेली आहे. सदर योजने अंतर्गत अनु.जाती ची 50 % पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात मुलभुत सोयी सुविधा कामे व ईतर अपक्रम राज्य शासनाच्या ईतर योजनांची मेळ घालून मंजूर केली जातात. या योजने सोबतच राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनाची सदर गावांमध्ये अंमलबजावणी करून सदर गावांचा सर्वागीन विकास करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ गावत संर्वागीण विकास करणे
आवश्यक कादपत्रे
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) सदर योजने अंतर्गत गावाची निवड हि शासनस्तरावरुन करण्यात येते.
सदर लिंक
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
6. सैनिकी शाळेतील अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय क्र. संकीर्ण2002/ प्र.क्र.371/ मावक-3, दिनांक- 05.08.2003
2.शासन निर्णय क्र. इबीसी 2003/प्र.क्र.184/ मावक-२, दिनांक- 17.09.2003
3. शासन निर्णय क्र. अजाशि2019/प्र.क्र.53/ शिक्षण- 1 दिनांक- 21.03.2019
योजनेची थोडक्यात माहीती मागासवर्गीय विदयार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनिमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे आकर्षण त्यांच्यात विदयार्थीदशेतच निर्माण व्हावे , विदयार्थ्यामध्ये शिस्त ,आत्मविश्वासव,शौर्य,सांघिक वृत्ती,नेतृत्व ,देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासणा होण्यासाठी ही योजना लागु करण्यात आली आहे.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ मान्यताप्राप्त सैनिक शाळेतील विदयार्थ्यांना प्रतिवर्षी रु.15000/- सैनिकी शाळा निर्वाह भत्ता देण्यात येते
आवश्यक कादपत्रे 1.आधार कार्ड
2.जातीचे प्रमाणपत्र
3.उत्पन्न दाखला
4.परिक्षेचे गुणपत्रक
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑनलाईन
सदर लिंक https://prematric.mahait.org
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://prematric.mahait.org
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
7. कन्यादान योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय क्र साविसो-2003/प्रक्र7/सुधार-1, दि 24 डीसेबर 2003
2.शासन निर्णय क्र सावियो-2018/प्रक्र110र्थ-1, दि 02 फेबुवारी 2019
योजनेची थोडक्यात माहीती समाजातील मागासवर्गीयांचे विवाह वाढत्यामहागाईत कमी खर्चात व्हावे व मागासवर्गीय कुटूंबाचा विवाहावर होणारा खर्च कमी व्हावा यासाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर योजना सुरु करण्यात आली आहे.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ रुपये २० हजार इतके अर्थसहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावे धनादेशाव्दारे विवाहाच्या दिवशी देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्था व संघटनांना प्रत्येक जोडप्यामागे रुपये ४ हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
आवश्यक कादपत्रे 1.महाराष्ट्राचा रहीवाशी असल्याचा पुरावा
2.वर व वधु यांचे जातीचे प्रमाणपत्र
3.विवाह नोंदणी प्रमाणपत्र
4.दाम्पत्यापैकी वराचे वय 21 व वधुचे वय 18 असल्याबाबत पुरावा
5.बँक पास बुक
6.आधार कार्ड
7.स्वयंमसेवी संस्थेकडुन प्रस्ताव
8.रहीवाशी जिल्हयातील सहाय्यक आयुक्त समाज कल्ल्याण यांचे यापुर्वी लाभ घेतला नसनल्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑफलाईन
सदर लिंक
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
8. राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय क्र. इबीसी 2003/प्र.क्र.115/मावक-२, दिनांक- 11.06.2003
2.शासन निर्णय क्र. इबीसी 2003/प्र.क्र.115/मावक-२, दिनांक- 21.07.2003
योजनेची थोडक्यात माहीती इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास २ लाख ५० हजार, सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक बोर्डामधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास १ लाख, सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यास ५० हजार सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांस १० हजार, सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमधून इयत्ता १० वी व १२ वी परिक्षेत विद्यार्थ्यास ५ हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
आवश्यक कादपत्रे 1. शाळा,क.महाविदयालय यांचे पत्र
2. जातीचे प्रमाणपत्र
3. आधार कार्डची प्रत
4. बँक पासबुकची प्रत
5. परिक्षेचे गुणपत्रक
6. बँक खाते आधार कार्डशी सलग्न केल्या बाबतचा पुरावा
7. सत्र परिक्षेच्या निकालाची प्रत
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑफलाईन
सदर लिंक
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 ते 2 महीने तसेच शासनाकडुन प्राप्त निधीच्या अधिन राहुन
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
9. गटई योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय क्र विघयो-1097/प्रक्र175/मावक-2, दि 31 डीसेबर 1997
२.शासन निर्णय क्र गटई-2011/प्रक्र147/मावक-2, दि 08 डीसेबर 2011
योजनेची थोडक्यात माहीती गटई पत्र्याचे स्टॉल हे एका कुटूंबात केवळ एकाच व्यक्तीला दिला जाते.ग्रामीण भाग, क वर्ग नगरपालिका ब वर्ग- अ वर्ग नगरपालिका तसेच महानगरपालिका व छावणी क्षेत्रात सदर गटई स्टॉल करिता जागा उपलब्ध करुन घेण्याची जागा संबंधित स्टॉलधारकाची राहील.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ पत्र्याचे स्टॉल लाभार्थ्यांना वाटप केल्या जातात तसेच रक्कम रु 500/- प्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यांस अनुदान दिल्या जाते.
आवश्यक कादपत्रे 1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी व अनुसूचित जातीचा असावा.
2. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामिण भागात रु.40000/- पेक्षा व शहरी भागात रु.50000/- पेक्षा अधिक नसावे, या साठी तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल.
3. अर्जदाराचे वय 18 वर्षे पक्षा कमी नसावे.
4. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिक, छावणी बोर्ड( कॉन्टोनमेंट बोर्ड), किंवा महानगरपालिक यांनी त्यास भाडयाने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वत:च्या मालकीची असावी.
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑफलाईन
सदर लिंक
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 ते 2 महीने तसेच शासनाकडुन प्राप्त निधीच्या अधिन राहुन
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
10.मुख्यमंत्री वयोश्री योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग,मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्र.ज्येष्ठना-2022/प्र.क्र.344/सामासु दि.06.02.2024 नुसार योजना राबविण्यात येते.
योजनेची थोडक्यात माहीती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदीन जिवन सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यातसाठी आवश्यक सहाय्य उपकरणे जसे चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाईकल कॉलर ई. खरेदी करणे करिता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र ई. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक दि.31.12.2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षें पुर्ण केलेली असावी.
आवश्यक कादपत्रे 1. आधारकार्ड / मदतान कार्ड
2. आधारलिक बँकेचे बँक पासबुक ची
झेरॉक्स
3. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
4 लाखाच्या आत वार्षिक उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र 5.शासनाने ओळख पटविण्यासाठी विहीत केलेले अन्य कागदपत्र
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑफलाईन
सदर लिंक
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 ते 2 महीने तसेच शासनाकडुन प्राप्त निधीच्या अधिन राहुन
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
11.तिर्थ दर्शन योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग,मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्र.ज्येष्ठना-2024/प्र.क्र.189/सामासु दि.14.07.2024
योजनेची थोडक्यात माहीती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे,सोबत कोणी नसल्याने किंवा पुरेशी माहिती नसल्याने अनेक जेष्ठ नागरिकांचे भारतात किंवा महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र जाण्याचे स्वप्न पुर्ण होत नाही.अशा सर्व सामान्यजेष्ठ नागरिकांना देशातील मोठया तीर्थ स्थळांना जाऊन मन:शांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीचे / दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करण्यात आलेली आहे.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ जेष्ठ नागरीकांना तिर्थक्षेत्र जाणे येणे
करीता रेल्वेमार्फत जाणे येणे या बाबत सुविधा देण्यात येते
आवश्यक कादपत्रे लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. वयाची 60 वर्ष पुर्ण असणे आवश्यक.
1. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 2.50 लाखपेक्षा जास्त नसावे. लाभ मिळण्याकरीता सादर करावयाची कागदपत्रे
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑफलाईन
सदर लिंक
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 ते 2 महीने तसेच शासनाकडुन प्राप्त निधीच्या अधिन राहुन
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
12.जेष्ठ नागरीक धोरण योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) मातापीता व जेष्ठ नागरीक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007
शासन निर्णय क्र जेष्ठाना-2014/प्रक्र 215/ सामासु दि 31 जुलै 2024 अन्वये
योजनेची थोडक्यात माहीती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या विचारात घेऊन त्यांना त्यांचे जीवन सुसहयपणे जगता यावे ही बाब विचारात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-२०१३ यास मा मंत्रिमंडळाने दि. ३०/०९/२०१३ रोजी मान्यता दिली आहे, त्यातील तरतूदीनुसार भा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भ क.४ अन्वये दि. २६ मे, २०१६ च्या शासन निर्णयान्वये ज्येष्ठ नागरिक यांना न्याय दणे
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ जेष्ठांना सामाजिक न्याय देणे
आवश्यक कादपत्रे जेष्ठांनी दिलेल्या तक्रारी च्या अनुषंगाने कार्यवाही करणे
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑफलाईन
सदर लिंक
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 ते 2 महीने तसेच शासनाकडुन प्राप्त निधीच्या अधिन राहुन
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
13.तृतीयपंथीय योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) सामाहजक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. क्र.तृतीय-20२3/प्र.क्र.122/सामासु दिनांक : 11 माचण, २०२४
योजनेची थोडक्यात माहीती राज्यातील ट्रान्सजेंडर/तृतीयपंथीय व्यक्तींसाठी सर्वकष धोरण आखणे यासह विविध धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी/नवीन योजना, नियम तयारों करण्यासाठी शिफारशी करणे इ. साठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संदर्भाधीन दि. १४ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ जेष्ठ नागरीकांना त्यांच्या तक्रारीवर सुनावणी घेऊन निराकरण करणे
आवश्यक कादपत्रे जेष्ठांनी दिलेल्या तक्रारी च्या अनुषंगाने कार्यवाही करणे
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑफलाईन
सदर लिंक
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 ते 2 महीने तसेच शासनाकडुन प्राप्त निधीच्या अधिन राहुन
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
14.भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (परराज्य)अनुसूचित जाती योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र. इबीसी. 2003/ प्र.क्र.301/ मावक-02 क्र. दिनांक- 01 नोव्हेंबर.2003
2. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन शुध्दीपत्रक क्र.इबीसी–2018/प्र.क्र.451/शिक्षण – 1 06 फेब्रुवारी,2019,
3. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.भासशी-2021/प्र.क्र.156/शिक्षण – 1 7 जुलै, 2023
4. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.इबीसी-2017/प्र.क्र.524/शिक्षण – 1 29 जानेवारी, 2018
योजनेची थोडक्यात माहीती महाराष्ट्र राज्यातील (वर्धा जिल्हा) रहिवाशी असणारे परंतु दुसऱ्या राज्यात प्रवेश घेतलेल्या अनु.जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सदर योजना लागु आहे.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ १) विद्यार्थ्यास निर्वाहभत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क.
२) अनु. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना दरमहा रु. २५० ते रू.७०० दराने निर्वाहभत्ता.
३) वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या अनु. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु.४०० ते रु.१३५० निर्वाहभत्ता.
आवश्यक कादपत्रे 1.शाळा सोडल्याचा दाखला
2.मागील वर्षातील परिक्षेच्या गुणपत्रीका
3.जातीचे प्रमाणपत्र (वर्धा जिल्हा)
4.अधिवास प्रमाणपत्र (वर्धा जिल्हा)
5.उत्पन्न प्रमाणपत्र,तहसीलदाराचे(मुलीचे लग्न झाले असल्यास पतीचे उत्पन्न)
6.महाविद्यालय प्रवेश पावती
7.वसतीगृहात प्रवेश असल्यास त्याचे प्रमाणपत्र
8.व्यावसाईक अभ्यासक्रम असल्यास कॅप लेटर
9. शिक्षण शुल्क समितीने निर्धारीत केलेले फी स्ट्रक्चर
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) ऑफलाईन
सदर लिंक
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
15.भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1. भारत सरकार शिष्यवृत्ती मान्यतेबाबतचे केंद्र शासनाचे निर्देश दिनांक 01 एप्रिल 2003
2. महाराष्ट्र शासान निर्णय सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र. इबीसी-2003/प्र.क्र.301/ मावक-2 दिनांक-01 नोव्हेंबर 2003 3. सामाजीक न्यान व विषेश सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक:भासशी-2021/प्र.क्र.156/ शिक्षण-1 दिनांक 7 जुलै 2023
योजनेची थोडक्यात माहीती 1.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन / उच्च शिक्षण घेता यावे
2.विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
3. शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
4. उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
5. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ o 1.विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबीवरील शुल्क प्रदान.
o 2.अभ्यासक्रमाच्या वर्गवारी नुसार वस्तीगृहात न राहणाऱ्यांना रु 250 ते 700 या दराने निर्वाह भत्ता.
o 3.वसतिगृहात राहुन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. 400 ते 1350 निर्वाह भत्ता.
आवश्यक कादपत्रे 1. शाळा सोडल्याचा दाखला
2. मागील वर्षातील परिक्षेच्या गुणपत्रीका
3. जातीचे प्रमाणपत्र
4. अधिवास प्रमाणपत्र
5. उत्पन्न प्रमाणपत्र,तहसीलदाराचे(मुलीचे लग्न झाले असल्यास पतीचे उत्पन्न)
6. महाविद्यालय प्रवेश पावती
7. वसतीगृहात प्रवेश असल्यास त्याचे प्रमाणपत्र
8. व्यावसाईक अभ्यासक्रम असल्यास कॅप लेटर
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
सदर लिंक https://mahadbt.maharashtra.gov.in
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
16.मॅट्रीकोत्तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप)
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1. भारत सरकार शिष्यवृत्ती मान्यतेबाबतचे केंद्र शासनाचे निर्देश दिनांक 01 एप्रिल 2003
2. महाराष्ट्र शासान निर्णय सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र. इबीसी-2003/प्र.क्र.301/ मावक-2 दिनांक-01 नोव्हेंबर 2003
3. सामाजीक न्यान व विषेश सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. इबीसी- 2016/प्र.क्र.221/ शिक्षण-1 दिनांक 31 मार्च 2016

योजनेची थोडक्यात माहीती 1.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन / उच्च शिक्षण घेता यावे
2.विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
3.शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
4.उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
5.विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.

योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ o o शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि विद्यार्थ्याने संस्थेला अनिवार्य किंवा सक्तीने देय असलेली इतर फी प्रदान करण्यात येते.
आवश्यक कादपत्रे 1.शाळा सोडल्याचा दाखला
2.मागील वर्षातील परिक्षेच्या गुणपत्रीका
3.जातीचे प्रमाणपत्र
4.अधिवास प्रमाणपत्र
5.उत्पन्न प्रमाणपत्र,तहसीलदाराचे(मुलीचे लग्न झाले असल्यास पतीचे उत्पन्न)
6.महाविद्यालय प्रवेश पावती
7.वसतीगृहात प्रवेश असल्यास त्याचे प्रमाणपत्र
8.व्यावसाईक अभ्यासक्रम असल्यास कॅप लेटर
9.जात वैधता प्रमाणपत्र (लागु असल्यास)

अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
सदर लिंक https://mahadbt.maharashtra.gov.in
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
17.व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता.
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1. महाराष्ट्र शासान निर्णय सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र. इबीसी-2003/प्र.क्र.301/ मावक-2 दिनांक-01 नोव्हेंबर 2003
3. सामाजीक न्यान व विषेश सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. इबीसी- 2003/प्र.क्र.311/मावक-2 दिनांक 09 जुन 2003
योजनेची थोडक्यात माहीती 1.शासकीय वसतिगृहांसाठी पात्र परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही.
2.व्यावसाईक अभ्यासक्रमात प्रवेश असावा.व महाविद्यालयाच्या वसतीगृहात प्रवेश घेतला असावा.
3.वार्षीक उत्पन्न 2.5 लाखाचे आत असावे.

योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ 1.4 ते 5 वर्षांच्या अभ्यासक्रमाचा कालावधी करीता 700/- रुपये प्रति महिना
2.2 ते 3 वर्षांच्या अभ्यासक्रमाचा कालावधी करीता 500/- रुपये प्रति महिना
3. अभ्यासक्रम कालावधी 2 वर्षांपेक्षा कमी करीता 500/- रुपये प्रति महिना

आवश्यक कादपत्रे 1.शाळा सोडल्याचा दाखला
2.मागील वर्षातील परिक्षेच्या गुणपत्रीका
3.जातीचे प्रमाणपत्र
4.अधिवास प्रमाणपत्र
5.उत्पन्न प्रमाणपत्र,तहसीलदाराचे(मुलीचे लग्न झाले असल्यास पतीचे उत्पन्न)
6.महाविद्यालय प्रवेश पावती
7.वसतीगृह प्रवेश प्रमाणपत्र
8.व्यावसाईक अभ्यासक्रम कॅप लेटर
9.जात वैधता प्रमाणपत्र (लागु असल्यास)

अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
सदर लिंक https://mahadbt.maharashtra.gov.in
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com
18.राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.महाराष्ट्र शासान निर्णय सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र. इबीसी-2003/प्र.क्र.301/ मावक-2 दिनांक-01 नोव्हेंबर 2003
2. सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र. इबीसी-2003/प्र.क्र.102/ मावक-2 दिनांक-11 जुन 2003

योजनेची थोडक्यात माहीती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ 1. इयत्ता 10 वी मध्ये 75% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता 11 वी आणि 12 वीं मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील मुलां- मुलींसाठी ही योजना लागू आहे.
2. ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता 11 वीं व 12 वी मध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध, प्रवर्गातील मुलां-मुलींसाठी आहे.

आवश्यक कादपत्रे 1.शाळा सोडल्याचा दाखला
2. इयत्ता 10 वी मध्ये 75% गुणपत्रीका
3.जातीचे प्रमाणपत्र
4.अधिवास प्रमाणपत्र
5.उत्पन्न प्रमाणपत्र,तहसीलदाराचे
6.महाविद्यालय प्रवेश पावती

अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
सदर लिंक https://mahadbt.maharashtra.gov.in
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295020
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com,
acswowardha@gmail.com