बंद

महत्वाची ठिकाणे

सेवाग्राम

स्वधर्गीय जमनलाल बजाज यांच्या् विनंतीवरुन सन 1936 साली महात्मां गांधी वर्ध्याला आले. त्यांनी आश्रम तत्कानलीन सेगावात करण्याचे निश्चित केले. सेवाग्राम आश्रमातूनच देशाची स्वा्तंत्र संग्राम चळवळ पूर्णअर्थाने सुरु होती. आजही गांधीजींचे उपयोगातील साहित्य सेवाग्राम येथील आश्रमात पाहावयास मिळते. आश्रमाच्या परिसरातच आदी निवास, बापू कुटी, ‘बा’कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी आदी ऐतिहासिक ठेवा जपण्याात आलेला आहे. या सर्वांची देखरेख आश्रम ट्रस्टि करत असते. सेवाग्राम आश्रमाच्या बाजूलाच गांधीजींच्याय जीवनावर आधारीत चित्रप्रदर्शनी आहे. तसेच भारत सरकारच्या पर्यटन आणि विकास खात्यांतर्गत पर्यटकांसाठी आश्रमाच्यार परिसरातच यात्रेकरूंसाठी निवासाची सोयही आहे. महात्मा गांधींच्या स्मरणार्थ सन 1944 साली कस्तुवरबा रुग्णायलयाची स्थाकपनाही सेवाग्राम येथे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डॉ. सुशीला नायर यांनी सन 1969 साली महात्माग गांधी वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरु केलेले आहे.

परमधाम आश्रम, पवनार

वर्ध्याचपासून पाच मैलाच्या अंतरावर धाम नदी काठावर पवनार हे गाव आहे. याठिकाणी आचार्य विनोबा भावेंनी 1934 साली परमधाम आश्रमाची स्थावपना केली. स्वोशांती, ब्रम्हामच्याच शोधात निघालेल्या विनोबाजींवर महात्माऊ गांधीजींच्यार विचारांचा प्रभाव पडला. त्यायमुळे त्यां नी अंतर्मनाचा ठाव लक्षात घेऊन पदयात्रा, भूदान चळवळ राबविली. तसेच येथूनच भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व् केले. आणखीन एक वैशिष्टतय म्हचणजे महात्माद गांधीजींच्या अस्थीचे या धाम नदीतच विसर्जन करण्याणत आले होते.

गीताई मंदिर

गीताई मंदिराला छत नाही की भिंती नाहीत. गायीच्या आकारासारखे हे मंदिर आहे. विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे भाषांतर केले. त्यांच्या भाषांतरीत गीताई पुस्त कातील अध्याय या मंदिरात उभ्या दगडांवर कोरले आहेत. मंदिराच्या बाजूलाच शांती कुटी आहे. त्याभमध्येद महात्माल गांधी, जमनालाल बजाज यांच्या आठवणी प्रदर्शनीच्या स्वारुपात जपण्याेत आल्या आहेत.

मगन संग्रहालय

ग्रामोद्योग आणि ग्रामविकासाच्या संकल्पलनेवर आधारीत असलेले हे ऐतिहासिक असे संग्रहालय आहे. महात्मास गांधींनी 30 डिसेंबर 1938 रोजी मगन संग्रहालयाचे उद्घाटन केले. वर्धा शहराच्याआ मधोमध असलेल्या या संग्रहालयात अनेक ऐतिहासिक आहे. या संग्रहालयात गांधीजींशी संबंधित वस्तूह सं‍ग्रहित करून ठेवण्यातत आलेल्याह आहेत. डॉ. कुमारप्पाय आणि आर्यनयकम यांच्यां अथक परिश्रमातून जनतेसमोर हा ऐतिहासिक ठेवा जपण्याकत आलेला आहे.

बोर अभयारण्य

बोर अभयारण्य वर्धा येथुन ४० किमी आहे. या अभयारण्यात वाघ, अस्वल, हरीण, सांबर, मोर इत्यादी प्राणी आढळतात. तसेच अनेक जातीचे पक्षी येथे आढळतात. जंगल सफरीची सोय येथे आहे.